Banda Tatya Karadkar : बंडातात्या कराडकरांची जीभ पुन्हा घसरली, महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य
वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे वारकरी संप्रायदायाचे बंडातात्या कराडकर यांची जीभ पुन्हा घसरली आहे.. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला.. टिळकांचं असं वाक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.. काल ते शहीद भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त राजगुरुनगरमध्ये बोलत होते.. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं..