Mumbai Nashik Highway ची चाळण, नाका-तोंडात धूळ जाण्यासाठी टोल भरायचा? याला हायवे म्हणायचं?
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
24 Sep 2021 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक मुंबई महामार्गाची अक्षरशः चाळण झालीय. महामार्गावर खड्याचे साम्राज्य तर आहेच परंतु अनेक ठिकाणी रस्त्यावचे डांबरच दिसत नसल्यानं राष्टीय महामार्ग आहे की ग्रामीण भागातील एखादा मातीचा कच्चा रस्ता एवढी वाईट अवस्था महामार्गाची झालीय, एखादे वाहन गेल्यावर रस्त्यावर धूळ एवढ्या मोठ्या प्रमाणात उडते की पुढची गाडीही दिसत नाही, राज ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्याच्या दूरवस्थे बाबत आवाज उठविल्यानं काही प्रमाणात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र इतर मार्गावर खड्डे चुकवीत जीवघेणा प्रवास करावा लागतोय, पावसाने विश्रांती घेतल्याने वाहन चालवताना रस्त्यावरचे धोकादायक खड्डे दिसत आहेत,खड्ड्यांचा अंदाज येत आहे एवढेच काय ते समाधान.