Bacchu Kadu Farmer Suicide: आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदारालाच कापा,बच्चू कडूंचं वादग्रस्त वक्तव्य

Continues below advertisement
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुलढाण्यातील शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर संजय शिरसाट आणि नितेश राणे यांनी टीका केली आहे. 'आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदारालाच कापा,' असे धक्कादायक विधान बच्चू कडू यांनी केले. आपल्या या वक्तव्यावर ते ठाम असून, वेळ आल्यास आपणच चोपू, असेही ते म्हणाले. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच, जातीय राजकारणामुळेच शरद जोशी, राजू शेट्टी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांवरही निशाणा साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola