Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये नगरपालिका (Nagarpalika) आणि नगरपंचायत (Nagar Panchayat) निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांमध्ये गोंधळ दिसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल, म्हणून ही सगळी लफडी सुरू असावी', असा घणाघाती आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेने (MNS) भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत. मुंबईत, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप केला आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात उमेदवार उभे करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. सांगलीतील विटा शहरात सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटनाही घडली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement