Maharashtra Farmer Distress: कर्जमुक्ती नाही, तर चक्का जाम; ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

Continues below advertisement
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पीक विमा आणि अतिवृष्टीच्या मदतीवरून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. 'सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरुन सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही,' असा थेट इशारा कडू यांनी सरकारला दिला आहे. दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन देऊनही एक पैसाही न मिळाल्याने भाजप (BJP) आणि मित्रपक्षांच्या सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. लोकांच्या डोळ्यांवरची खोडकर थापांची पट्टी आता गळून पडली असून जनता जागी झाली आहे, असे ते म्हणाले. विधीमंडळ अधिवेशनात (Vidhimandal Session) पीक विमा आणि मदतीचे प्रश्न पुराव्यानिशी मांडून सरकारला जाब विचारणार असल्याचेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola