Bacchu Kadu Protest : सरकारसोबत चर्चेसाठी बच्चू कडू मुंबईत येणार, उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

Continues below advertisement
शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन अधिक तीव्र झाले असून, ते मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत चर्चा करण्यास तयार झाले आहेत. 'आम्ही तिथे चर्चेला आल्यानंतर आमच्यावर हात उचलला, तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे,' असा थेट इशारा आमदार बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. सरकारच्या वतीने मंत्री पंकज भोयर आणि आशिष जैस्वाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर कडू यांनी चर्चेची तयारी दर्शवली, मात्र कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नागपूरच्या जामठा येथील महामार्गावर सुरू असलेले हे आंदोलन आता परसोळीच्या मैदानावर हलवण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. आता उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola