Aurangabad: राजू भुमरेंकडून मारहाणीचा आरोप, रोहयो मंत्र्यांच्या भावाची 'दादागिरी'? ABP Majha

Continues below advertisement

राज्याचे रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांचे बंधू राजू भुमरेंनी मारहाण केल्याचा आरोप एकानं केलाय.  राजू भुमरेंसह दहा ते पंधरा जणांच्या जमावानं लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पाचोडच्या रणजित नरवडे उर्फ बबलू यांनी केलाय. रणजीत नरवडे हे बीड हायवे क्रमांक २११ ते साजगाव रस्ते कामाचं फेसबुक लाईव्ह करत होते. त्याचवेळी राजू भुमरे यांच्यासह काही लोकांनी त्यांना मारहाण केल्याचं रणजित नरवडे यांचं म्हणणं आहे. आता यावर रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या बंधूची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram