Bihar Politics: 'RSS नेते ब्रिटिशांचे तळवे चाटत होते', Asaduddin Owaisi यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) प्रचारादरम्यान AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर (RSS) जोरदार निशाणा साधला आहे. 'जेव्हा इंग्रजांविरुद्ध मुसलमान, हिंदू, दलित एकत्र होऊन लढत होते, तेव्हा आरएसएसचे नेते ब्रिटिशांचे तळवे चाटत होते', असे खळबळजनक वक्तव्य ओवैसींनी केले आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांच्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते. सरकारी योजनांचा लाभ घेऊनही मुस्लिम भाजपला मत देत नाहीत, त्यामुळे ते 'नमक हराम' आहेत, असे गिरीराज सिंह म्हणाले होते. यावर ओवैसींनी हल्लाबोल करत म्हटले की, जे आज आम्हाला 'नमक हराम' म्हणत आहेत, ते स्वतः इंग्रजांची 'नमक हलाली' करत होते, तर आम्ही इंग्रजांविरुद्ध फतवे काढून त्यांची झोप उडवली होती.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement