Maharashtra Politics: 'शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना फडणवीसांनी स्थगिती दिली', अंबादास दानवेंच्या दाव्याने खळबळ

Continues below advertisement
माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या दहा 'नमो' योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना फडणविसांनी स्थगिती दिली.' या बंद करण्यात आलेल्या योजनांमध्ये नमो महिला सशक्तीकरण, नमो कामगार कल्याण, नमो शेततळे अभियान आणि नमो शहर सौंदर्यीकरण यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी अशा योजना का सुरू केल्या नाहीत, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. या आरोपामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola