Akola Water Problem | अकोल्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ

Akola Water Problem | अकोल्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ 
अकोल्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची दाहकता जाणवतेये. जिल्ह्यातल्या उगवा गावात गावकऱ्यांना तब्बल महिनाभरातून एकदाच नळाचं पाणी मिळतं.  त्यामुळे गावकऱ्यांवर टँकरचे पाणी विकत घ्यायची वेळ आलीये. बहुतांश कुटुंबांना दर १५ दिवसांनी ६०० रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे महिन्याला हजार ते बाराशे रुपये पाण्यावर खर्च करावे लागतायेत. गेली अनेक वर्षं इथं अशीच स्थिती आहे.. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून गावातील सर्वांनाच टँकरचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागतो. 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 22 April 2025 
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पर्यटकाचा मृत्यू तर १२ जण जखमी, सुरक्षा यंत्रणांकडून सर्च ऑपरेशन सुरू 
मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानं ४ लाख ६३ हजार मच्छिमारांना होणार फायदा, तर गोसीखुर्द प्रकल्पाला २६ हजार कोटींचा निधी, भंडार-चंद्रपूर-नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ 
उद्धव ठाकरे हे मुंबईतील लॅण्ड स्कॅमचे बादशाह, भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शेलारांचे गंभीर आरोप. 
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य... राज ठाकरे ३० एप्रिलला तर उद्धव ठाकरे ४ मे रोजी परदेशातून परतणार..उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक, संजय राऊतांची माहिती... 
सुनेत्रा काकी आणि अजितकाकांबद्दल प्रेम, आदर कायम, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण...विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola