Pawar's Warning: 'ही जितरा माझ्या बारामतीत का आहेत?', Ajit Pawar संतापले; चोराला पकडल्यास १ लाखाचे बक्षीस
Continues below advertisement
बारामतीमधील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. 'ही जितरा माझ्या बारामतीत का आहेत ते मला काय ख्याल नाही,' अशा शब्दात अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला. बारामतीमध्ये काही लोक वाळू आणि पुलाचे भाग चोरून नेत असल्याच्या घटनांवरून ते नाराज होते. या चोरांना पकडण्यासाठी त्यांनी एक अनोखी योजना जाहीर केली आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला मोबाईलमध्ये चित्रित करून पकडून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे पवार म्हणाले. तसेच, जो कोणी चोरी करताना सापडेल, त्याला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल आणि दंडाच्या रकमेतूनच बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या 'जितरां'चा बंदोबस्त झालाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement