Agri-Unrest: 'एकच नोंदणी केंद्र का?', बाळापुरातील संतप्त शेतकऱ्यांचा सवाल, रस्त्यावर उतरून आंदोलन

Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये सोयाबीन विक्रीच्या नोंदणीवरून प्रचंड गोंधळ उडाला असून संतप्त शेतकऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले आहे. 'संपूर्ण तालुक्यासाठी केवळ एकच नोंदणी केंद्र का?' असा सवाल करत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि नियोजन कोलमडल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. एकाच केंद्रावर संपूर्ण तालुक्याचा भार आल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola