ABP Majha Impact | अकोला : चित्तलवाडीच्या गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळणार,1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर
उमेश अलोने, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सहा दिवसांपूर्वी आम्ही तेल्हारा तालूक्यातील चित्तलवाडी गावाच्या पाण्याचा प्रश्न मांडणारी बातमी दाखवली होती. या गावात पाण्यातील सिलिका घटकामुळे निर्माण झालेल्या किडनीच्या आजाराने वर्षभरात गावात 40 लोकांचा मृत्यू झाला. एबीपी माझाच्या बातमीनंतर या गावाचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या पुढाकाराने राज्य सरकारने चित्तलवाडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 85 लाख 58 हजारांचा निधी मंजूर केला आहे.