ABP Majha Headlines : 08 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार, मंत्रिमंडळ विस्तारासाठी लवकरच राज्यातील तीनही महत्वाचे नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती.
कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
ठाण्यात विजय संकल्प मेळावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
((महायुतीचा विजय संकल्प मेळावा))
ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
(('महायुतीला तडीपार करू म्हणणारेच तडीपार'))
मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न, शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनाच्या दिवशी साजरा केला जाणार विजयाचा जल्लोष, सर्व कार्यकर्ते नेते मंडळींना वर्धापन दिनादिवशी मुंबईत येण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
राज्यात आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक वारीचे मोठ्या प्रमाणात स्वागत करा, तसेच वारकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेकडून हवी ती मदत आणि सोयी द्याव्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३,९०६ आरोग्य कर्मचारी तैनात...श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू
ईव्हीएम आणि मंगेश पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही, असं मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलंय..
देशात लोकशाहीची हत्या, फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? वायकर प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा सवाल, तर मुंबई उत्तर-पश्चिममधील निवडणुकीविरोधात कोर्टात जाणार, ठाकरेंचं वक्तव्य.
मतमोजणी केंद्रावर हजारो मोबाईल होते, २० पेक्षा अधिक उमेदवार मतमोजणी केंद्रावर होते, मग एकटा रवींद्र वायकर काय करु शकतो? आदित्य ठाकरेंच्या आरोपांना खासदार रवींद्र वायकर यांचं प्रत्युत्तर.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पडली, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं स्पष्टीकरण.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीवेळी वायकर यांचे मेव्हणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात होते, हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांचा आरोप..
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित केली जाणार, वर्षा गायकवाड यांच्या आरोपांनंतर सूत्रांची माहिती.
आदित्य ठाकरेंकडून बी.डी.डी चाळीतील नागरिकांची भेट...यावेळी आदित्य ठाकरे लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद..
४०० पार नंतर भारत हिंदुराष्ट्र झालं
असतं, टी. राजा सिंह यांचं भिवंडीतल्या धर्मसभेत वादग्रस्त वक्तव्य. १०० किल्ल्यांवर
मशीद आणि दर्गा,शिंदेंनी सफाई करावी' टी राजा यांची मागणी. तसंच वक्फ बोर्ड कायदा संपवून टाका, टी. राजा यांचं वक्तव्य.