Aashish Deshmukh on Farmer : रिक्त जागांवर तातडीनं भरती करावी ;आशिष देशमुखांची मागणी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAashish Deshmukh on Farmer : रिक्त जागांवर तातडीनं भरती करावी ;आशिष देशमुखांची मागणी शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळाला पाहिजे.. त्यांना उचित मोबदला मिळाला पाहिजे... सरकारने तातडीने रिक्त जागांवर भरती सुरू केली पाहिजे... ही माझी पक्षश्रेष्ठींकडे मागणी राहील..झालेल्या पराभवाची मीमांसा आणि त्यामधून शिकवण घेऊन महाराष्ट्रात आपले सरकार पुन्हा कसे येईल यासाठी कार्यतत्पर आहोत.... महाविकास आघाडीचे नेत्यांनी या पुरोगामी महाराष्ट्रात संकुचित राजकारण केलं....धर्माधर्मात आणि जाती जातींमध्ये भेद लावण्याचा काम महाविकास आघाडीने आणि त्यांच्या नेत्यांनी केलं... भाजपच्या मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेले विकास कामांमुळे महाराष्ट्र आणि विदर्भ भाजपच्या पाठीशी उभा झाल्याशिवाय राहणार नाही.... ही निवडणूक मुद्द्यांवर व्हावी याकरिताच महायुतीचे प्रयत्न होते मात्र महाविकास आघाडीने जातीजातींमध्ये भेद लावून जे संकुचित राजकारण केलं ते पुरोगामी महाराष्ट्रासाठी योग्य नाही.... महायुतीमध्ये बच्चू कडूचा प्रहार पक्ष एक घटक पक्ष आहे... सर्व घटक पक्षांना न्याय देण्याची भूमिका भाजपची आहे... अशा परिस्थितीत बच्चू कडूना विचार करायचा आहे की त्यांनी त्यांचा समोरच राजकारण विकासाकडे न्यायच की विध्वंसकडे न्यायचं आहे...