मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर 61 टक्के लोक समाधानी, महाविकास आघाडी सरकारची कामगिरी कशी?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2021 12:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या एकूण सात वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारनं नोटाबंदी, जीएसटी, राम मंदीर, तिहेरी तलाक, जम्मू काश्मिरमधून 370 कायदा हटवण्यासह अनेक मोठे निर्णय घेतले. आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय ठरले. त्यानंतर कोरोनासारख्या महामारीनं जगासह देशालाही मोठा फटका बसला. नुकतेच पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता मोदी सरकारबद्दल आणि पंतप्रधान मोदींबाबत देशातील जनतेचं मत बदललं आहे की तेच आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.