Devendra Fadnavis : कृषी कायद्यासंदर्भात काही लोकांची दुटप्पी भूमिका : देवेंद्र फडणवीस


काही लोकं या कृषी कायद्याचा संदर्भात दुटप्पी भूमिका घेतायत. महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा 2006 साली झाला. या कायद्यामुळे कोणाची शेती हिसकावून घेतली गेली असं झालेलं नाही. या कायद्यात शेतकरी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाऊ शकत नाही. मात्र नवीन कायद्यानुसार शेतकरी न्यायालयात दाद मागू शकतो, असं विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. मांजरी बुद्रुक या ठिकाणी आयोजित भाजपच्या शेतकरी संवाद मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार बापुसाहेब पठारे आणि माजी आमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola