Kolhapur : आई-वडिलांना सांभाळा नाहीतर वारसा नोंद होणार रद्द, माणगाव ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद निर्णय

समाजात हल्ली आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करणारे मुलं-मुली अनेकदा आढळतात. अशांना चाप लावणारा आदेश एका ग्रामपंचायतीनं काढला आहे. वारसा नोंद रद्द करण्यात येईल, असा ऐतिहासीक निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे. शिवाय नवीन वारसा नोंद करताना देखील आई-वडिलांची काळजी घेणार, तसे न केल्यास कारवाईस पात्र राहील असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. इतकेच नाही तर अशा मुलांना वीज, पाणी या मूलभूत सुविधा देखील न पुरवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.  याविषयी कोल्हापूरातील माणगावचे सरपंच राजू मगदूम यांनी काय माहिती दिलीये पाहूयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola