Kolhapur :संतप्त शेतकऱ्यांनी चक्क महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय पेटवलं : ABP Majha
संतप्त शेतकऱ्यांनी चक्क महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांचं कार्यालय पेटवून दिलंय.. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरु केलंय. मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याच संतापातून अज्ञात शेतकऱ्यांनी कोल्हापूर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला आग लावली...