कोरोना प्रादुर्भावामुळे दिल्लीत तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द, केजरीवालांचा निर्णय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्ली सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीत तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रातही घ्यावा अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे.