Jalna : प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार किटचं वाटप
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 11:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालनामध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलंय. प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. आणि जिल्हा क्षयरोग केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हे किट वाटप कऱण्यात आलंय. भारत सरकारने वर्ष 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत “ कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेंशट ” हा उपक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येतोय. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनामुळे जालना जिल्ह्यातील सर्व क्षयरुग्णांना एकाच वेळी पोषण आहार किट वाटप करण्यात आले