Jalna Lathicharge : मनोज जरांगेंचं अल्टिमेटम, सरकारचं शिष्टमंडळ दुपारी जालन्यात येणार
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 12:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आता आक्रमक झालेत. जोपर्यंत सरकारचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत पाणीही न पिण्याचा पुनरुच्चार त्यांनी काही वेळापूर्वी केलाय. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी काही वेळीपूर्वी जरांगे यांची भेट घेतली. आणि सरकारचं शिष्टमंडळ दुपारी साडेबारा वाजता येईल, असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे यांना राज्यातून मिळणारा पाठिंबा आणि रोज भेटणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यामुळे सरकारकडून हालचालींना वेग आलाय.