Jalgaon Crime: तिसरीही मुलगीच झाली म्हणून बापानं घेतला जीव
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalgaon Crime: तिसरीही मुलगीच झाली म्हणून बापानं घेतला जीव सरकार बेटी बचाव बेटी पढाव चा नारा जरी देत असलं तरी अजूनही जनतेच्या मानसिकतेच म्हणावा तसा बदल घ़डलेला दिसत नाही. जळगाव जिल्ह्यात एका बापानं, दोन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगीच झाली म्हणून ८ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून तिची हत्या केली. जामनेर तालुक्यातील हरिनगर तांडा येथे ही घटना घडली. गोकुळ जाधव असं या हैवान बापाचं नाव आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीची हत्या केल्यावर, आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला असा कांगावा केला, आणि तिच्यावर तात्काळ अंत्यसंस्कार केले. मात्र आशा सेविकांना याची माहिती मिळताच त्यांना संशय आला, आणि त्यांनी वरिष्ठांना कळवलं. नंतर पोलीस तपास सुरू झाला, ज्यामध्ये बापाचं हे कृत्य समोर आलं. पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करत गोकुळ जाधव या आरोपीला अटक केली.