Lata Mangeshkar : जेव्हा राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर दोन भारत रत्न एकत्र आले, सचिन तेंडुलकर आणि दीदी!

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. 

२०१५ मध्ये राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर दोन भारत रत्न एकत्र आले. सचिन तेंडुलकर आणि दीदी यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. राज ठाकरेंनी घडवून आणला होता हा सुरवर्ण क्षण. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola