UNCUT PM Modi | जेव्हा निराशा पसरते, तेव्हा भगवान बुद्धांचा विचार प्रासंगिक : पंतप्रधान मोदी
त्याग, समर्पणाची भावना म्हणजे गौतम बुद्ध. भगवान बुध्द म्हणजे एक पवित्र विचार आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जनतेत येण्यास आवडलं असतं, पण सध्याच्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही. जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुध्दांचा विचार प्रासंगिक ठरतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका प्रार्थना सभेमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले.