Ayodhya Verdict | भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया, अयोध्या निकालानंतर मोहन भागवत यांची प्रतिक्रिया | ABP Majha
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलंय. या निकालाकडे जय किंवा पराजयाच्या दृष्टीकोनातून पाहू नका, असं आवाहन मोहन भागवत यांनी केलंय. देशाची एकता आणि बंधुत्वाचं परिपालन करणारा निकाल आहे. भूतकाळ विसरुया आणि एकत्र येऊया असंही भागवतांनी म्हटलंय.