Ayodhya Verdict | विविधतेत एकता या मूल्याचं जगाला दर्शन, अयोध्या निकालानंतर मोदींकडून जनतेचं कौतुक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक केलं. भारताची लोकशाही मजबूत आहे, आज पुन्हा एकदा दिसून आलं. विविधतेत एकतेचा मंत्र उजळून निघाला आहे. 9 नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. भारताची न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र असून कोणत्याही कठीण पेचप्रसंगावर कायद्याने तोडगा काढणं शक्य आहे, हे आज दिसून आलं, असं मोदींनी म्हटलं.