Satyapal Malik on Modi Govt : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
abp majha web team
Updated at:
08 Nov 2021 10:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकरी आंदोलनावरुन मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधलाय. सहाशे शेतकरी शहीद झाल्यानंतरही दिल्लीचे नेते लोकसभेत प्रस्ताव मंजूर करु शकले नाहीत अशा शब्दांत मलिक यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. छोटी घटना घडली की शोकसंदशे देणारे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गप्प का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच शेतकरी आंदोलनासारखं मोठं आंदोलन देशात झालं नाही असंही मलिक यांनी म्हटलंय.