S. Jaishankar :पाकिस्तान-चीनला एकत्र आणल्याच्या राहुल गांधींच्या आरोपावर परराष्ट्रमंत्र्यांचं उत्तर
abp majha web team
Updated at:
03 Feb 2022 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तान आणि चीनला मोदी सरकारनं एकत्र आणल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांना उत्तर दिलंय. राहुल गांधींनी इतिहास वाचायला हवा असं जयशंकर यांनी म्हटलंय. चीन आणि पाकिस्तान याआधीही एकत्र होते असं सांगताना जयशंकर यांनी आधीची दोन उदाहरणंही दिली आहेत. १९६३ मध्ये पाकिस्ताननं शक्सगाम व्हॅली बेकायदेशिररित्या चीनला सोपवली होती आणि १९७० साली चीननं पाकव्याप्त काश्मीरमधून कोराकोरम हायवे बांधला होता याची आठवण जयशंकर यांनी करून दिलीय.