Rahul Gandhi on PM Modi : मोदी सरकार मृत शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील : राहुल गांधी ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Dec 2021 08:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्राकडं शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा नाही, मग पंतप्रधान माफी कोणाची मागतात असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी सरकारवर चांगलीच टीका केलीय. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत असंवेदनशील आहे. सरकारकडे मृत शेतकऱ्यांची माहिती नसली तरी काँग्रेसकडे मृत पावलेल्या ५०३ शेतकऱ्यांची यादी आहे. सरकारनं आमच्याकडून यादी घ्यावी असेही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंजाब सरकारनं ४०३ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५-५ लाख रुपये दिले आणि १५२ जणांना नोकरी दिल्याची माहितीही राहुल गांधी यांनी यावेळी दिली.