Rahul Gandhi on Agniveer : अग्निवीरवरून लोकसभेत गदारोळ, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

अग्निवीर योजनेवरुनही राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना घेरलं 

सैन्यातल्या अग्निवीर योजनेवरुनही राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना घेरलं.  अग्निवीरांना शहिदांचा दर्जा का देत नाही असा सवाल राहुल गांधींनी विचारला. शहीद झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबांना मोबदलाही दिला जात नसल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या आरोपांवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी खोटं बोलतायत असं राजनाथ म्हणाले.. राहुल गांधींनी सभागृहाची दिशाभूल करु नये असं प्रत्युत्तर अमित शाहांनी दिलं.. 

भाजपच्या पराभवावरुन राहुल गांधींनी भाजपला टोले

अयोध्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या भाजपच्या पराभवावरुन राहुल गांधींनी भाजपला टोले लगावले. राहुल गांधींनी अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांना संसदेत आपल्या शेजारी बसवलं. अवधेश प्रसाद हे समाजवादी पार्टीचे खासदार आहेत. अवधेश प्रसाद यांच्याशी राहुल गांधींनी हस्तांदोलनही केलं याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी आक्षेप घेतला. संसद ही हस्तांदोलन करण्याची जागा नाही. संसदेचं कामकाज नियमानुसारच व्हायला हवं अशी मागणी अमित शाहांनी केली..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola