हवं तर बसवर भाजपचे झेंडे लावा, पण बस सुरु करण्यास परवानगी द्या, प्रियांका गांधींचा भाजपला टोला

Continues below advertisement
प्रवासी मजुरांना बस सुविधा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकार आमने-सामने आहे. दरम्यान प्रियांका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन योगी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी बसवर भाजपचे झेंडे लावायचे असतील तर लावा, मात्र बस सोडा, असा टोला प्रियांका गांधी यांनी लगावला. या बसेसमुळे 92 हजार लोकांना मदत मिळणार आहे. आमच्या बसेस अजूनही उभ्या आहेत, मात्र योगी सरकार या बसेसना परवानगी देत नाही. आतापर्यंत आम्ही 67 लाख गरजू नागरिकांना मदत केल्याची माहितीही प्रियांका गांधी यांनी यावेळी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram