Pramod Sawant on Mhadei River Issue : म्हादई नदीच्या पाणी प्रश्नावर केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल
Continues below advertisement
Pramod Sawant on Mhadei River Issue : "म्हादई नदीच्या पाणी प्रश्नावर केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल"
महाराष्ट्रानंतर आता गोवा आणि कर्नाटकात म्हादई नदीचा पाणी प्रश्न पेटला,पाणी प्रश्नावर केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातले सीमावाद किंवा पाणीवाद काही नवीन नाहीत. दरम्यान आता याच कर्नाटकाने म्हादई नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून थेट गोवा सरकारशी देखील पंगा घेतला आहे. याच मुद्द्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्र सरकारशी चर्चा केली. दरम्यान आपल्या दिल्लीवारी नंतर बोलताना प्रमोद सावंत यांनी या प्रकरणांमध्ये केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दिलीये.
Continues below advertisement