First Mann Ki Baat In 2021 | 26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झाल्यानं देश दु:खी : PM Modi Speech
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. नव्या वर्षातील पंतप्रधान मोदींची पहिली मन की बात होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "26 जानेवारी रोजी झालेला तिरंग्याचा अपमान पाहून फारच दुखी झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "राष्ट्रपतींनी संयुक्त सत्राला संबोधित केल्यानंतर 'बजेट सत्र' सुरु झालं आहे. अशातच आणखी एक गोष्ट घडली, ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो, ती म्हणजे पद्म पुरस्कारांची घोषणा. यंदाही पद्म पुरस्कारांच्या यादीत त्या लोकांचा समावेश आहे, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केलं आहे. आपल्या कार्यानं अनेकांचं जीवन बदललं आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या महिन्यात भारतीय क्रिकेट संघानेही चांगली कामगिरी केली. आपल्या क्रिकेट संघाने सुरुवातीला अनेक खचता खाल्यानंतर, शानदार वापसी करत ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आलेली मालिका आपल्या नावे केली. आपल्या खेळाडूंचं परिश्रम आणि एकता प्रेरणा देणारी आहे.