कुन्नूर हेलिकॉप्टर अपघातातील 13 जणांना पालम विमानतळावर श्रद्धांजली, पंतप्रधान मोदीकडून आदरांजली
abp majha web team
Updated at:
10 Dec 2021 12:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : दिल्लीतल्या पालम विमानतळावर हेलिकॉप्टर अपघातातील 13 जणांचे पार्थिव आणण्यात आले आहे. यावेळी देश सुन्न झाला होता. याचं कारण तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात देशानं सीडीएस जनरल बिपीन रावत (BIPIN RAWAT) यांना गमावलं. बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा अपघातात मृत्यू झाला. आज तामिळनाडूतून13 जणांचं पार्थिव दिल्लीतल्या पालमपूरमध्ये आणण्यात आलं. यावेळी निधन झालेल्या 13 जणांचं कुटुंब उपस्थित होते. कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली अर्पण केली. शिवाय तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान उद्या 13 जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.