जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा गोळीबार; 4 भारतीय जवान शहीद, 3 नागरिकांचा मृत्यू
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात 4 जवान शहीद झाले आहेत तर तीन नागरिकांची मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय सैन्य सर्व क्षेत्रांमध्ये चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे.