भारताने चीन विरोधात आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे. मंगळवारी चिनी 59 अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर आता चिनी कंपन्या भारताच्या महामार्ग प्रकल्पात भाग घेऊ शकणार नाहीत, असा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.