New Delhi : मुख्यमंत्र्यांची जवानाच्या पाठीकर कौतुकाची थाप ABP Majha
वर्दीतल्या एका जवानाने आपल्या मनाची संवेदनशीलता जपत लिहिलेल्या कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केलं. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान विकास वाघमारे यांनी लिहिलेल्या या कविता पुस्तकाचे नाव 'वर्दीतला ग्रामीण कवी' हे आहे. दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात विकास वाघमारे कार्यरत आहेत.