Mumbai-Delhi Railway | येत्या चार वर्षात मुंबई-दिल्ली मार्गावर दोनशेहून अधिक गाड्या वाढणार : रेल्वे बोर्ड अध्यक्ष | ABP Majha
येत्या चार वर्षात मुंबई-दिल्ली मार्गावर 200 ते 250 गाड्या अधिक वाढवणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तसेच पुढच्या 50 वर्षांसाठी आतापासून सीएसएमटी स्टेशनची मागणी पूर्ण करण्यासाठी काम करू असे देखील ते म्हणाले. मुंबईत काल शनिवारी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी बैठका घेऊन एमआरव्हीसी, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या कामाची माहिती घेतली.