Jammu & Kashmir : मोदी सरकारमुळे लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गेच्या शक्तीवर परिणाम झालाय : Rahul Gandhi
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी म्हणाले, "काल जेव्हा मी वैष्णो मातेच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा तिथे त्रिशक्ती होत्या - दुर्गा जी, लक्ष्मी जी, सरस्वती जी. 'दुर्गा जी' ज्याला आपण दुर्गा माँ म्हणतो; दुर्गा हा शब्द 'दुर्ग' वरून आला आहे; 'दुर्गा मा' म्हणजे संरक्षण करणारी शक्ती.
ते पुढे म्हणाले, "लक्ष्मी माँ म्हणजे 'ध्येय' पूर्ण करणारी शक्ती; जर तुमचे ध्येय पैसे असेल तर तुम्ही जे सांगितले ते देखील खरे आहे. जर तुमचे ध्येय दुसरे काही असेल, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मिळणारी शक्ती म्हणजे 'लक्ष्मी माँ'.
राहुल गांधी म्हणाले, "सरस्वती जी ती शक्ती आहे, ज्याला आपण विद्येची देवी/शक्ती, ज्ञान म्हणतो. या तीन शक्ती आहेत. जेव्हा या त्रिशक्ती घरात किंवा देशात असतात तेव्हा देशाची प्रगती होते. भारतात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मा लक्ष्मीची शक्ती कमी झाली आहे की वाढली आहे? शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे दुर्गा मातेची शक्ती कमी झाली की वाढली? जेव्हा भारतातील प्रत्येक संस्था, महाविद्यालय आणि शाळेत आरएसएसमधील व्यक्ती बसवला जातो, तेव्हा आई सरस्वतीची शक्ती कमी होते की वाढते? उत्तर आहे, कमी होते.