India China Face-Off | पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोलावं : मनमोहन सिंह
पूर्व लडाखमध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावरुन भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांना सल्ला दिला आहे. "आपल्या लोकशाहीची जबाबादारी पंतप्रधानांवर आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे," असं मनमोहन सिंह म्हणाले. यासंदर्भात मनमोहन सिंह यांनी आज पत्रक जारी केलं आहे.