Kargil Vijay Diwas : ऑपरेशन विजय! कारगिल युद्धात कशी चारली पाकला धूळ?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jul 2021 03:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appkargil vijay diwas : देशात आज 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शहीद जवानांना अभिवादन केलं आहे. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता.
कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो.