Afghanistan crisis : काबूलमधून शेकडो भारतीय मायदेशी परतले, भारतात पाऊल ठेवताच अनेकांना अश्रू अनावर!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2021 05:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाबूलमध्ये अडकलेले शेकडो भारतीय आज मायदेशी परतले आहेत... 168 जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 विमान गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर दाखल झालंय. भारतीय वायुदलाच्या या मोहिमेमुळं फक्त भारतीयांचीच नव्हे, तर अनेक अफगाण नागरिकांची देखील तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.. अनेक जण आपल्या लेकरा-बाळांसह आणि वृद्ध माता-पित्यांसह भारतात दाखल झाले आहेत.. विमानातून उतरताच अनेकांना अश्रू अनावर झाले.. दरम्यान अफगाणिस्तानातल्या दुशांबेमधून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल झालं.