Afghanistan crisis : काबूलमधून शेकडो भारतीय मायदेशी परतले, भारतात पाऊल ठेवताच अनेकांना अश्रू अनावर!

काबूलमध्ये अडकलेले शेकडो भारतीय आज मायदेशी परतले आहेत... 168 जणांना घेऊन भारतीय वायुसेनेचं C-17 विमान गाझियाबादमधल्या हिंडन एअरबेसवर दाखल झालंय. भारतीय वायुदलाच्या या मोहिमेमुळं फक्त भारतीयांचीच नव्हे, तर अनेक अफगाण नागरिकांची देखील तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटका झाली आहे.. अनेक जण आपल्या लेकरा-बाळांसह आणि वृद्ध माता-पित्यांसह भारतात दाखल झाले आहेत..  विमानातून उतरताच  अनेकांना अश्रू अनावर झाले.. दरम्यान अफगाणिस्तानातल्या दुशांबेमधून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं विमान सकाळी पाच वाजून बारा मिनिटांनी दिल्ली विमानतळावर दाखल झालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola