India Poverty Index : देशातील 4.6 कोटी लोक गरीबीच्या खाईत, अहवालानुसार जगातले अर्धे गरीब भारतात
भारतातील गरिबी आणि विषमतेचं चित्र संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून समोर आलंय. कोरोना संकटाची सुरुवात झाली त्या 2020 मध्ये भारतात 4 कोटी 60 लाख नागरिक गरिबीच्या खाईत लोटले गेले. म्हणजे जगभरातल्या गरिबांमधील 50 टक्के गरीब भारतात असल्याचं या आकडेवारीतून समोर येतंय. दुसरीकडे देशातल्या अब्जाधीशांची संख्या याच काळात 102 वरून 143 वर गेलीय. 2021 मध्ये देशातल्या 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची एकत्रित संपत्ती तब्बल 57.3 लाख कोटी इतकी विक्रमी वाढली आहे.