Farmers Protest : Delhi : दिल्लीच्या सीमेवरील तंबू, मंडप हटवले ABP Majha
कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल १३ महिने, जवळपास ३७८ दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता हेच शेतकरी आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघालेत. शेतकऱ्यांनी आंदोलना दरम्यान दिल्लीच्या सीमेवर उभारलेले तंबू हटवलेत... एकीकडे शेतकरी आंदोलनाच्या यशाचा आनंद तर दुसरीकडे सातशेहून अधिक शेतकरी बांधवांना गमावल्याचं दुःख मनात ठेवत शेतकरी सामानाची आवराआवर करतायत. शेतकरी आजचा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करतायत..