Sanjay Raut : लोकशाहीचे चारही स्तंभ सरकार मोडीत काढतंय, संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा

संजय राऊत यांनी पेगॅसस प्रकरणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्ष केंद्र सरकारकडे या विषयावर चर्चेची मागणी करत आहेत. पण सरकार यावर बोलण्यास तयार नाही. आता सर्वोच्च न्यायालय सांगतंय की, हा विषय गंभीर असेल तर चौकशी होणं गरजेचं आहे. आता विषय गंभीर आहे की नाही? हे संसदेत चर्चा झाल्याशिवाय कसं कळणार? , असं संजय राऊत म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola