Bihar Liqour : बिहारमध्ये दारुबंदीचा फज्जा, विषारी दारु पिऊन एकाच दिवसात 31 जणांचा मृत्यू

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारु पिऊन एका दिवसात 31 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात गोपालगंजमधल्या 20 जणांचा तर बेतियातल्या 11 जणांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर विषारी दारुमुळं अनेकांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे.  गेल्या आठवड्यात मुजफ्परपूरमध्ये विषारी दारुनं 6 जणांना जीव घेतला होता. विषारी दारुवरुन बिहारचं राजकारण देखील चांगलच तापलं आहे. दारुबंदीचा फज्जा उडाल्याचं म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola