Bihar Liqour : बिहारमध्ये दारुबंदीचा फज्जा, विषारी दारु पिऊन एकाच दिवसात 31 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
05 Nov 2021 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारु पिऊन एका दिवसात 31 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यात गोपालगंजमधल्या 20 जणांचा तर बेतियातल्या 11 जणांचा समावेश आहे. एवढंच नव्हे तर विषारी दारुमुळं अनेकांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. गेल्या आठवड्यात मुजफ्परपूरमध्ये विषारी दारुनं 6 जणांना जीव घेतला होता. विषारी दारुवरुन बिहारचं राजकारण देखील चांगलच तापलं आहे. दारुबंदीचा फज्जा उडाल्याचं म्हणत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.