Thane Potholes | खड्ड्यांच्या चक्रव्युहातून ठाणेकरांची सुटका कधी? कुणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं मात्र या शहरातील तलावांपेक्षा जास्त संख्या झाली आहे ती म्हणजे खड्ड्यांची, आता सध्याच्या ठाणे शहराच्या स्थितीवरून हे खड्ड्यांचं ठाणं आहे असं म्हणायची वेळ आलीय. पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, सोबतच मेट्रोचं काम सुरू असल्याने रस्त्याची जागा कमी झाली असून त्यात खड्डे असल्याने जीव धोक्यात घालत प्रवाशांना वाहनं न्यावी लागत आहेत. यासर्वामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होत आहे.