Nashik : कालसर्प शांती करण्यावरून पुरोहितांमध्ये वाद ABP MAJHA

कालसर्प शांती करण्यावरुन त्र्यंबकेश्वरमध्ये परप्रांतीय पुरोहितांच्या २ गटात हाणामारी झाल्याची घटना घडलीय... नागपूरच्या यजमानला एका गटाने शांतीसाठी ११ हजार रुपये खर्च सांगितला.. तर दुसऱ्या गटाने हीच कालसर्प शांती कमी खर्चात करुन देण्याचा दावा केला आणि यावरुनच दोन्ही गटात वाद झाला.. त्यानंतर नाशिकच्या हिरावडीत दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी झाली.. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केल्यानंतर गावठी कट्टा, तलवारीही आढळून आल्या.. पुरोहित वर्गात आधी देखील वाद झाले आहेत पण आता या वादात चक्क काडतुसं, गावठी कट्टा आढळून आल्याने खळबळ उडालीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola