राजा उधार झाला, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
पुणे: केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच करण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते मांजरी बुद्रुक या ठिकाणी आयोजित भाजपच्या शेतकरी संवाद मेळाव्याला संबोधित करत होते. या प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह इतर भाजप नेते उपस्थित होते.